सोमवार, ३० नोव्हेंबर, २००९

कारण काय?


सगळे म्हणतात कुठेतरी;
हरवून गेलंय माझा हसणं;
मी माझे पंख मिटलेत;
अन् आवाजातही उदासिची लकेर.
उगीचच भिरभिरणाऱ्या पापण्या;
अखंड इकडेतिकडे धावणारी नजर;
आता थांबूनच गेली;
कुठेतरी अचानक कधीतरी.


हसताना माझ्याभोवती;

दुनिया सारी आनंदात;
मी पकडलेला असतो;
एक धागा निराशेचा.

मग मीच विणत जातो एक;
मोकळी ढाकळी उदासिची वीण;
पण कारण या उदासिच;
मी ही नाही अन् कोणीच नाही.
सगळ्याला कारण हे जगणंच;
ज्यान् उडी मारली कड्यांवरून;
आता हे जीवन चाललं तरी दुखत;
अन् हे थांबलं तरी ठणकतं.

۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩

आता नाही

आसवांचा जुना आड आता नाही
वेदनांचे तसे लाड आता नाही..
मांडला मी असा स्वप्न बाजार पुन्हा
वास्तवाच्या भुता 'झाड' आता नाही..

वेदनांची खरी जाहली मज सोबत
संकटांना नव्या "हाssssड", आता नाही..
कल्पनांचा मना लाभला आधार नि...
भावनांची तशी चाड आता नाही..
झेलले घाव सारे सदा सुमनांचे
अन नव्याने भ्रमर धाड....., आता नाही.



۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩۞۞۩۩۞۩۩۞۩۩۞۩۩